कोपरगाव शहराला भेडसावत असणाऱ्या पाणी प्रश्नाला कोल्हेच जबाबदार
– सुनील गंगुले,
सत्ताधारी विरोधकांचे आंदोलन नौटंकी
कोपरगाव प्रतिनिधी:---- कोपरगाव शहराच्या लोकसंख्येनुसार कोपरगाव शहराला पाणी आरक्षित आहे मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे आरक्षित असलेले सर्व पाणी कोपरगाव नगरपरिषदेकडून उचलले जात नाही. पर्यायाने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते हि वस्तूस्थिती आहे. त्यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आमदार आशुतोष काळे मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावासाठी आग्रही होते. मात्र मागील पाच वर्षात माजी आमदार कोल्हे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाला विरोध केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर भर पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोपरगाव शहराला भेडसावत असणाऱ्या कुत्रिम पाणी टंचाईला कोल्हेच जबाबदार असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. त्या निधीतून प्रत्यक्षात खोलीकरणाचे काम देखील सुरु करण्यात आले होते त्यावेळी विरोधकांनी हे काम होवू दिले नाही. खोलीकरणाच्या कामासाठी आलेला जेसिबीची मोडतोड केली. त्यावेळी जर चार नंबर साठवण तलावाचे काम झाले असते तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती.
भविष्यात कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना असणाऱ्या आमचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांनी सत्ता नसतांना देखील पाच नंबर साठवण तलावाच्या कामासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी देखील कोल्हेंनी पाच नंबर साठवण तलावाला पडद्यामागून विरोध करण्यात धन्यता मानली. आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले. हेच काम माजी आमदार कोल्हे यांनी निवडून आल्यावर केले असते तर आज हि परिस्थिती शहरातील नागरिकांवर आली नसती. मात्र फक्त आमिष दाखवायची आणि नागरिकांना झुलवत ठेवायचे त्यामुळे आज शहरातील नागरिकांना भर पावसाळ्यात पाणी साठा मंजूर असतांना फक्त आणि फक्त साठवण क्षमता नसल्यामुळेच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे याला सर्वस्वी कोल्हेच जबाबदार असून त्यांचे सत्ताधारी नगरसेवकांनी केलेले आंदोलन नौटंकी असल्याचे गंगुले यांनी म्हटले आहे
0 Comments