आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास गावचा विकास सहज शक्य - आ आशुतोष काळे

             राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास गावचा विकास सहज शक्य - आ आशुतोष काळे

         





 कोपरगाव प्रतिनिधी:----  राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास  प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

       जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व चांदेकसारे येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

         ते म्हणाले की, साडेचार वर्षापूर्वीविकास करण्याच्या बाबतीत माझ्यावर विश्वास दाखवून ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी समर्थपणे पार पाडून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. तोच विश्वास विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर दाखविला. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून मतदार संघातील आरोग्य, शिक्षण रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य देवून या प्रश्नांना दिले आहेत. संपूर्ण मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा अतिशय महत्वाचा गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला आहे. वर्षानुवर्षापासून झालेली गोदावरी कालव्यांची दुरावस्था झाल्यामुळे वहनक्षमता कमी होऊन शेतीला वेळेवर आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता. त्याबाबत  जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपये गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले असून प्रत्येक वर्षाला १०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यापैकी चालू वर्षी आजपर्यंत ५५ कोटी रुपये निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक गाव विकासाच्या वाटेवर घेवून जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

           याप्रसंगी सभापती पोर्णिमाताई जगधने,उपसभापती अर्जुनराव काळेसदस्य सौ. अनुसयाताई होन, अनिल कदम, ॲड. राहुल रोहमारेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाणरोहीदास होन, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीरामजी वक्ते,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदेसरपंच संजय गुरसळउपसरपंच स्वाती रणधीरसंतोष पवारशंकरराव गुरसळ,पंकज पुंगळबालमभाई सय्यदभास्कररावहोनशंकरराव चव्हाण, राहुल जगधने,खातीबभाई सय्यददिगंबर पवारसलिम शेख,कल्याण गुरसळभगीरथ होनसुभाष होन,भिमाजी होनद्वारकानाथ होनराजेंद्र औताडे,नंदकिशोर औताडेशंकरराव औताडेशरद होनदेवेन रोहमारेसुभाषजी होनभिमाजी होनद्वारकानाथजी होनभास्कर होनराजेंद्र औताडेविलास चव्हाणकर्णा चव्हाण,शंकरराव औताडे,  विठ्ठल होन आर.आर. होनमोहन गुजरनूरमोहम्मद शेखभिमाजी होन, राजाभाऊ होनभगीरथ होन, दौलतरावहोनअर्जुन होनभास्कर होन, डी.जी. शेख,सय्यदबाबा शेख,मधूकर खरातशरद होन,हसन सय्यदमतीन शेखकिरण होन,विश्वनाथ होन, रवींद्र खरातधीरज बोरावके,युनूस शेखअशोक होनपंकज होनसागर होनदादासाहेब होनपुंजाजी होनद्वारकानाथ होन, सुनील खरातकांतीलाल होनसचिन होनकिरण पवारफारुख शेखमन्सूर शेख,पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशीउत्तमराव पवारकेंद्रप्रमुख निळे सरकुलधरण मॅडमग्रामसेवक सुकेकआदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments