मला विधानसभा निवडणूकीतील पराभव मान्य, श्रीमान सातभाई हेच कोल्हे ताईंच्या पराभवाचे खरे शिल्पकार
----- नगराध्यक्ष विजय वहाडणे.
![]() |
![]() |
दि. 30 ऑक्टोबर 2010 मध्ये ज्यांनी ठराव केला कि आरक्षित जमीन संपादित करण्यासाठी फार मोठी रक्कम लागते नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही जमीन संपादित करता येणार नाही. तरीही सर्वे नं. 210 वरील आरक्षण का उठविले असे मलाच विचारणाऱ्यानीच माजी नगरसेवक बबलू वाणी यांच्या भूखंडावरील आरक्षण उठविण्याचा विषय का मंजूर केला? स्वतःजवळच्या व्यक्तींना एक न्याय व गिरमे परिवाराच्या आरक्षण उठविण्यालाच विरोध का? खोटी व अपुरी माहिती देऊन पत्रकबाजी करणारे नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अपप्रचार करताहेत.
माझ्यावर कर्ज आहे पण मी कर्ज बुडविणारा नाही. कारण मी 3 लाख रू. कर्जापैकी पन्नास हजार रू. याच महिन्यात बँकेत भरणा केला आहे.तुमच्याच मर्चंट बँकेत आमच्या भारत माता पतसंस्थेचे 50 लाख रू.अडकलेले आहेत. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाची बँक खाऊन तुम्ही तुरुंगात जाऊन बसले. पण मी मात्र माझ्या वडिलांच्या निधनानंतर शहरवासीयांच्या मदतीने नगराध्यक्षपदी जाऊन बसलो. छातीठोकपणे सांगतो 10 वर्षात झाली नव्हती इतकी कामे शहरात झाली आहेत-होत आहेत. पण तुम्ही राजकिय स्वार्थापोटी नाहक अडथळे आणत आहात.
श्रीमान सातभाई व माझ्यात मात्र एक साम्य आहे. ते व मी दोघांनीही तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. ते बँक खाल्ली म्हणून तुरुंगात गेले व मी जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा तुरुंगवास पत्करला. माझे वडिल आमदार-खासदार-नामदार होते तरीही मी कर्जबाजारी आहे. मी सातभाई यांची बरोबरी करूच शकत नाही.
तुमच्याच काळात येसगाव तळ्यातील मासे पकडण्याचा ठेका (1 लाख 6 हजार रू. वार्षिक) 5 वर्षांसाठी दिला होता. मी मात्र तोच ठेका (14 लाख 14 हजार रू.वार्षिक) दिला. तुम्ही याच ठेक्यात भानगड केल्याने कोपरगाव नगरपरिषदेचे 5 वर्षात 65 लाख रू. नुकसान झाले. मी ठेक्यात भानगडी न केल्याने नगरपरिषदेला किमान 70 लाख रू. लाभ झाला.
पत्रके वाटून रस्त्यांच्या टेंडरबद्दल कितीही बदनामी करा. पण सर्व जनतेसाठी या टेंडरची कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. खरे खोटे जनता ठरवेल. टेंडर चुकीचे असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. सर्वजण मिळून मला घेरण्याचा कितीही प्रयत्न करा, जनता मात्र सूज्ञ आहे.
मी कुणालाही हरामखोर- पाजी-नालायक-हलकट म्हणणार नाही. फक्त सातभाई म्हंटले तरी पुरेसे आहे असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकात शेवटी म्हटलं आहे.
0 Comments