आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पाणीजार विक्रीकरणाऱ्यांसाठी प्रशासनाने सकारात्मक भुमिका ठेवावी.-- कमलाकर कोते.

  पाणीजार विक्रीकरणाऱ्यांसाठी प्रशासनाने सकारात्मक भुमिका ठेवावी.-- कमलाकर कोते.




शिर्डी /किशोर पाटणी:-------  शिर्डी शहरात नव्हेतर नगर जिल्ह्यातील  सक्षम अधिकारी यांची परवानगी न घेता पाण्याचे जार /केन प्रकल्प उभारणी करुण  पाण्याचे अनपॅक जार ,कँन  नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत   हद्दीत विक्री होत असल्याने    योग्य ते परवाना कागदपत्रे सादर करण्या बाबत नुकत्याच नोटीसा बजावण्यात आल्या असून काही ठिकाणी आरो पॅल्ट सिल करण्याची प्रक्रिया सुरू असुन हा एक प्रकारे अन्याय असुन तांत्रिक अडचणी दूर करत  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळा  भुजल प्राधिकरण व अन्न व औषध प्रशासन  यांनी सहानुभूती पुर्वक निर्णय घेण्याची गरज यासाठी खा सुजय विखे खा सदाशिव लोखंडे यांची  लवकर व्यवसाय धारकाचे  शिष्टमंडळ घेऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु अशी माहिती शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी दिली

        कोते यांनी सांगितले की रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांनी  दहा पंधरा लाख रुपये खर्च करून थंडगार पाणी वितरण करण्यासाठी आरो पॅल्ट उभे केले  रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केला हि काय चुक आहे का ? अशा लोकांची संख्या जवळपास नगर जिल्ह्यात एक हजाराच्या आसपास आहे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला  

  सहजपणे परवानगी मिळत नाही हि खरी अडचण या व्यवसायातील अडचण  आहे  या तीन हि विभागाकडे पुरेसे  मनुष्य बळ उपलब्ध  नाही या  व्यवसायासाठी  महाराष्ट्र प्रदुषण  नियंत्रण  महामंडळाच्या निरेदेशानुसार व भुजल प्राधिकरण  व अन्न व औषध प्रशासन यांची परवानगी न  घेता  महाराष्ट्र भर हा व्यवसाय  मोठ्या प्रमाणावर वाढला आहे या बाबत दुमत नाही    हे जरी खरे असले तरी सकारात्मक भूमिका प्रशासनाने ठेवली पाहिजे  अशा प्रकारचा प्रकल्प उभा करण्यासाठी  दहा ते पंधरा लाखांची  गुंतवणूक करुन किमान महिन्याला लाखभर रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी अनेकांनी असे प्रकल्प सुरू केले होते त्यातुन काहींना रोजगार देखील मिळाला होता हे नाकारता येणार नाही  काही नगर पालिकेने या अगोदर च कारवाई करुण प्रकल्प सिल केले आहे  असे अनेक प्रकल्प विविध नावाने थंडगार पाणी जार वितरण करताना दिसुनयेत आहे असे असले तरी अगोदर कोरोणा महामारी आजारामुळे बाजारपेठेत आर्थिक मंदी असताना या व्यवसायात ज्यानी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली आहे अशा लोकांना मात्र या कारवाईमुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे  बेरोजगारीचे संकटं उभे राहणार आहे अनेक कुटुंबांना यांचा फटका बसणार आहे  हा एक प्रकारे अन्याय असुन ज्या विभागाचा यासाठी संबंध येतो त्या विभागाचा सामान्य माणसासाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण असे  होताना दिसुन येत नाही  हे दृदैव आहे  त्यासाठी आपण नगर जिल्ह्यातील चालकाच्या माध्यमातून लढा देण्यासाठी वचनबध्द असुन  न्याय मिळाला नाहीतर थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगताना या लोकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी लवकरच या सर्व लोकांची बैठक घेणार असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments