विस्थापितासांठी पुकारलेल्या अंदोलनाला भा.ज.पा.चा पाठिंबा.-- दत्ता काले
संपादक :- शाम दादापाटील गवंडी.
उपसंपादक:- योगेश रुईकर पा.
कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव शहरातील विस्थापित झालेल्या अतिक्रमण धारकांना गेल्या दहा वर्षापासुन न्याय मिळालेला नाही, याप्रश्नी वारंवार निवेदन देउनही प्रश्न मार्गी लागत नाही, म्हणून कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने हाती घेतलेल्या आंदोलनास कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीचा पाठींबा असल्याचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी जाहीर केले.
याप्रश्नी जाहीर पाठींबा असल्याचे निवेदन तहसिलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले, यावेळी शहराध्यक्ष दत्ता काले, भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, कामगार आघाडीचे जिल्हा संयोजक सतीश चव्हाण, रविंद्र रोहमारे आदी उपस्थित होते. दत्ता काले यावेळी म्हणाले, सुमारे दहा वर्षापुर्वी शहरातील अतिक्रमण काढण्यात आले, यामध्ये अनेक छोटे व्यावसायिक विस्थापित झाले,त्यामुळे अनेक कुटूंबाची उपासमार झाली, तर अनेक कुटूंबे उध्दवस्त झाली. हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी आमदार सौ स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी वारंवार बैठका घेउन पाठपुरावा केला. त्याप्रमाणे नगरपरिषदेच्या १५ एप्रिल२०१७ रोजी सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरावही मंजुर करण्यात आला. तसेच यापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब, मा.बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन नगराध्यक्ष सुरेखा राक्षे यांच्या कार्यकाळात नगररचना विभागास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानसचिव यांच्या अभिप्रायानुसार नेमून दिलेल्या जागेवर खोकाशाॕप करणेस सुचविले होते. परंतु आज अतिक्रमण अनेक दिवस उलटूनही नगरपरिपद विस्थापितांना खोकाशाॕप देउ शकली नाही. त्यामुळे विस्थापिंताचे मोठया प्रमाणात हाल झाले. अनेकांना आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, त्यात सध्याच्या कोरोना महामारीमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली. छोटे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटूंबावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. तरीही पालिका या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीने आंदोलन हाती घेतलेल्या आंदोलन जो पर्यंत हा प्रश्न तडीस जात नाही, तोपर्यंत या आंदोलनात कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टी कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीच्या सोबत असल्याचे श्री काले यांनी जाहीर केले.
0 Comments